काम केल्याचे वीस रुपये मागितल्याचा आला राग त्याने केला गटई कामगाराचाच खून

Ahmednagar Breaking News
0

 काम केल्याचे वीस रुपये मागितल्याचा आला राग  त्याने केला गटई कामगाराचाच खून


राहुरी प्रतिनिधी:-राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामपंचायत समोर चप्पल दुरुस्ती (गटई) काम करणारे  विलास नारायण कांबळे यांनी चप्पल दुरुस्ती करून त्याचे  २० रूपये मागितल्याचा राग आल्यामुळे भाऊसाहेब किसन वाघमारे (राहणार मांजरसुंबा अहमदनगर) याने खिळे ठोकायचा हस्तीने डोक्यात,छातीवरकेलेल्या बेदम मारहाणी मध्ये विलास कांबळे यांचा एक डोळा निकामी होऊन जबरदस्त केलेल्या मारहाणीमुळे  विलास कांबळे या गटई कामगाराचा नगर येथे उपचारा दरम्यान गुरुवार दिनांक 29 /9 /2022 रोजी रात्री मृत्यू झाला आहे.गोरक्षनाथ विलास कांबळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे भाऊसाहेब वाघमारे याच्या विरुद्ध भादविक ३०२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोसई/ खोंडे करीत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top