अधिकारी काय फक्त खुर्च्या उबवायला आलेत का? माजी नगरसेवक निखिल वारे यांचा मनपा प्रशासनाला सवाल.

Ahmednagar Breaking News
0

प्रभागातील कचर्‍याची समस्या सोशल मिडियावर व्हायरल!

अधिकारी काय फक्त खुर्च्या उबवायला आलेत का? माजी नगरसेवक निखिल वारे यांचा मनपा प्रशासनाला सवाल.



नगर - सावेडी उपनगरातील प्रभाग 2 मधील कचरा संकलन प्रश्न सुटण्याऐवजी अजून गंभीर होत चालला आहे. वसंत टेकडी, श्रीराम चौक, श्रीकृष्णनगर, वीर सावरकर मार्ग, शिलाविहार अशा परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा सुंदर रस्त्यांवर अस्वच्छता, प्रभागातील ही कचरा समस्या अखेर सोशल मिडियावर फोटोसह व्हायरल करुन मनपा प्रशासनाला माजी नगरसेवक निखिल वारे यांनी संतप्त सवाल केला, याची चर्चा सर्वत्र होत आहे.

याबाबत श्री.वारे यांना विचारले असता ते म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात आले होते. कुंड्या हटवून घंटागाड्या सुरु केल्या. साचलेला कचरा हटविला. मनपाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली आणि शहर स्वच्छ होऊन थ्री स्टार मानांकन मिळाले होते.

आता मात्र सावेडी परिसरात एकही परिसर असा नाही कि तेथे कचरा नाही. प्रभाग 2 मधील काही भागातील फोटो आज श्री.वारे यांनी व्हायरल करीत मनपा प्रशासनाला काही प्रश्न उपस्थित करुन धारेवर धरले. कचर्‍याच्या फोटोपुढे हेच अहमदनगर महानगरपालिकेचे थ्री स्टार मानांकर का? कचरा संकलन ठेकेदार मनपाच्या अधिकार्‍यांना जुमानत नाही का? अधिकारी फक्त खुर्च्या उबवायला आलेत का? सर्व कामे नगरसेवकांनीच करायची का? हेच महाराष्ट्रातील 6 नंबरचे स्वच्छ शहर आहे का? असे प्रश्न मनपाला विचारले. याची चर्चा प्रभागात सुरु आहे. यावर मनपा प्रशासन काय उत्तर देते? का निरुत्तर राहून प्रत्यक्षात स्वच्छता मोहिम राबवून उत्तर देते हे पाहणे उचित ठरेल.

कचर्‍याच्या या समस्येमुळे ‘स्वच्छ शहर, सुंदर प्रभागाला’ मात्र ग्रहण लागले आहे; ते कधी सुटेल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top