समाजात समरसता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी काम करावे.- गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज.

Ahmednagar Breaking News
0

समाजात समरसता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी काम करावे.- गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज.

श्री क्षेत्र देवगड येथे पत्रकार दिन व 'स्नेह पुरस्कार' वितरण सोहळा संपन्न.

नेवासा,प्रतिनिधी,(08.जानेवारी.) : देशाचे वैभव वाढीसाठी व समाजात समरसता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी काम करावे. सन्मान स्वीकारणाऱ्यांनी अपमान सहन करण्याची देखील तयार ठेवावी असे प्रतिपादन  गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

          नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने श्री क्षेत्र देवगड येथे गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन व स्नेह पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, मार्गदर्शक  विनायक दरंदले, गुरुप्रसाद देशपांडे, सुखदेव फुलारी, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ कचरे, देवगडचे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे, प्रसिद्ध गायक  बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

            यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्वलन करून पत्रकार दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक केले.  गुरुप्रसाद देशपांडे यांनी पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला. 

         गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले,  "पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक अडीचणींना सामोरे जावे लागते, सन्मानाबरोबर अवमान ही सहन करावा लागतो, चांगले काय वाईट काय याचे मंथन करून ते समाजापुढे मांडत रहाणे हेच पत्रकारांचे काम आहे, पत्रकारांचा झालेला सन्मान त्यांचा नसून त्यांच्या गुणांचा सन्मान आहे, समाजात अनेक होणाऱ्या घडामोडी समाज्याला कळाव्यात म्हणून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत असतो. 

                       स्नेह पुरस्कार'चे मानकरी  

यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते बन्सीभाऊ एडके (आदर्श वृत्तपत्र विक्रेता), उमाकांत भोगे (जीवन गौरव), अशोक डहाळे (आदर्श पत्रकारिता), सोपान भगत(इलेक्ट्रॉनिक मीडिया) स्नेह पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.

           सर्व जाती धर्माची देवस्थाने ही समाजाच्या सुखा करीता आहे,तिर्थक्षेत्रांच्या होणाऱ्या उन्नतीमुळे उद्योग व्यवसाय उभे रहातात. त्यामुळे परीसरातील लोकांना  रोजगार उपलब्ध होत असतो सर्व देवस्थानच्या उत्कर्षासाठी देखील पत्रकारांनी योगदान द्यावे असेही आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

            यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने डायरी व लेखणी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. फिल गुड कंपनीचे प्रमुख डॉ.भारत करडक व सुनील मोरे यांच्यावतीने पत्रकारांना  गुळ कँडी पुड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुधीर चव्हाण यांनी केले तर विनायक दरंदले यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top