पाण्याच्या प्रश्नासाठी नगरसेविका रूपालीताई वारे आक्रमक.

Ahmednagar Breaking News
0

सावेडी उपनगरातील पाणी प्रश्नासाठी नगरसेविका रूपालीताई वारे आक्रमक. मनपा स्थायी समितीच्या सभेत राजीनाम्याचा दिला इशारा.

नगर,प्रतिनिधी.(15. फेब्रुवारी.) : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका रूपालीताई वारे यांनी उपनगरातील पाणी टंचाई संदर्भात उपायुक्त यशवंत डांगे यांना मोकळी पाण्याची बाटली भेट देऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाणी प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येत्या आठ दिवसांमध्ये सावेडी उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असा इशारा नगरसेविका रूपालीताई वारे यांनी दिला.तसेच अधिकाऱ्यांची तक्रार पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करणार असा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top