चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाच्या चवथ्या दिवशी माहिलांचा मोठया प्रमाणात सहभाग.

Ahmednagar Breaking News
0

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करा.

चाळीसगाव,प्रतिनिधी.(24.सप्टेंबर.2023.) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालय समोर दि. २३  सप्टेंबर २०२३ रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने चवथ्या दिवशीच्या साखळी उपोषणात शिरसगाव येथील महिला भागिनी व मराठा समाज बांधवांनी  मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मराठा आरक्षण देताना राज्य सरकारने  वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिले मात्र ते सुप्रिम कोर्टात टिकले नाही. कोर्टात आरक्षण टिकावे म्हणून चांगले वकील देण्यात आले नाही, त्यामुळे आरक्षण बारगळले यामुळे मराठा समाजाचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन राज्य सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.मराठा समाजाचे राज्यात शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने काढण्यात आले.मोर्चाची दखल घेउन आरक्षण दिले मात्र ते कायदेशीर न दिल्याने   मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले समाजातून आरक्षणाची मागणी होत  असताना राज्य सरकार फक्त आरक्षण देण्याची ग्वाही मराठा समाजाला देत आहे,ठोस भूमिका घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर दि. २३ सप्टेंबर रोजी चवथ्या दिवशी शिरसगाव येथील माहिला भगिनी व मराठा समाज बांधव  साखळी उपोषणात सहभागी झाले,उपोषणात गणेश पवार,प्रमोदबापु  पाटील,खुशाल पाटील,विजय ( पप्पू) पाटील,दिलीप पाटील,संजय पाटील,नाना शिंदे,विलास गवळी, सुनील चव्हाण,प्रा. चंद्रकांत ठाकरे, अभिमान पाटील, तमाल देशमुख,विकास पवार,किशोर पाटील, मनोज भोसले,राजेंद्र पाटील,योगेश देशमुख,आर बी जगताप, विलास भोसले,सुनील देशमुख,ईश्वर पवार,छोटु अहिरे,पी एन  पाटील, सचिन गायकवाड,सचिन पवार,मनोज देशमुख,रविबाबा पाटील,शेखर देशमुख मनोज भोसले ,किशोर पाटील ,विलास मराठे, भरत नवले ,दिनेश गायकवाड मुकुंद पवार ,सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हे ,सतीश पवार, दीपक देशमुख, अनिल कोल्हे, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर शिंदे ,दिलीप पाटील, विलास भोसले ,प्रमोद वाघ ,सुनील देशमुख,  गणेश गोसावी, दीपक नागणे, संजय चित्ते, किरण पवार ,दत्तु पवार,योगेश पवार, विकास पवार  , संजय पाटील,नामदेव तुपे,जी जी वाघ यांच्यासह माहिला भगिनी रोशना पाटील अंबाबाई पाटील, बेबाबाई पाटील, विजया चव्हाण, शितल चव्हाण, लताबाई चव्हाण, सुनिता चव्हाण, निकिता चव्हाण ,शालुबाई पगार, रेखा चव्हाण ,प्रमिलाबाई पाटील, ठगूबाई तिरमली ,विमलबाई कोळी, अंजनाबाई पाटील, विमलबाई चव्हाण, प्रमिलाबाई मिस्तरी, अनिता चव्हाण, शालूबाई  चव्हाण, मनीषा पाटील ,सोनाली बोराडे, सुरेखा कडवे, शोभा सावळे, अलका कडवे तसेच मराठा समाज बांधव सहभागी झाले. साखळी उपोषणाला काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल निकम, डी वाय चव्हाण तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन च्या वतीने तालुका अध्यक्षा  सौ मनीषा पाटील व भ्रष्टाचार विरोधी आक्रोश या संस्थेच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल राठोड ,सोनालीताई लोखंडे,आर डी चौधरी, राजपूत समाजाचे सुनील राजपूत, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव,मा.नगरसेवक सुरेश स्वार. अरुण अहिरे, संजय ठाकरे,देवळीचे छगन जाधव,तळेगावचे गुणवंत शेलार , ग्रंथमित्र अण्णासाहेब धुमाळ , जगदीश महाजन, नीळकंठ साबणे, धनगर समाजाचे गणेश जाने, मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय गढरी,शेतकरी संघटनेचे आर के पाटील, पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठानचे रोहित जाधव, शिवसेना विभाग प्रमुख किरण आढाव ,अजीज खाटीक,सोनु शहा ,रफीक सैय्यद  यांनी पाठिंबा दर्शवला.तालुक्यातील मराठा समाज बांधव,महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी दि २४ ते २७ सप्टेंबर पर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top